Posts

Showing posts from November, 2020

'कुतूहल'डोळ्यांतील अश्रूंचे......

Image
डोळ्यातून अश्रू येणे ही मनातील भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे.रडण्याबाबत स्त्रीया पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील असतात.आकडेवारीनूसार स्त्री महिन्यातून सरासरी ५.३ वेळा रडते तर पुरुष महिन्यातून सरासरी १.३ वेळा रडतो.जैविकदृष्ट्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणामध्ये Testosterone हे हॉर्मोन असते जे पुरुषांना रडण्यापासून रोखते.त्या उलट स्त्रीयांमध्ये Prolactin हे हॉर्मोन अधिक असते ज्यामुळे अश्रू उत्तेजित होतात.मात्र डोळ्यांमध्ये अश्रू येण्यासाठी केवळ ही दोन हॉर्मोन्स कारणीभूत ठरत नाहीत.एकूण तीन प्रकारचे रडणे असून त्यामध्ये विविध यंत्रणा व केमिकल्सचा समावेश असतो.जाणून घ्या डोळ्यांमधील शुष्कता कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय ! जाणून घ्या 'कुतूहल' डोळ्यांतील अश्रूंचे..….. एलिझाबेथ गिल्बर्टने तिच्या 'इट,प्रे,लव' या पुस्तकामध्ये लिहीले आहे की,"रडल्याबद्दल माफी मागू नका कारण या भावनेशिवाय माणूस केवळ रोबट आहे." अश्रू म्हटले की मला मात्र एकच आठवते ते म्हणजे वसंत कानेटकरांचे 'अश्रूंची झाली फुले'.... आणखी एक म्हणजे वि स खांडेकरांची "अश्रू". आजच्या साम...

'कुतूहल'दिवाळीतील फटाक्यांचेआणि नैसर्गिक अतिषबाजीचे.....

Image
                     काही दिवसांपासून सगळी कडचे वातावरण बदलले आहे,सर्व काही आता झगमगीत झाले आहे.बाजारामध्ये लोकांची नवीन कपडे घेण्यासाठी रेलचेल सुरू आहे.कारण आता दिवाळी आली आहे.'दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी ',असे म्हणून आपण दिवाळीचे स्वागत करत असतो.दिवाळी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच जवळचा आहे.एकमेकांना भेटून शुभेच्छा देने, एकमेकांकडे फराळाला जाणे,नवीन कपडे घेणे हे सर्व दिवाळीमध्ये केले जाते.दिवाळीच्या या4,5 दिवसांत सर्वच आनंदी असतात. या दिवाळीत आणखी एक महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे फटाके वाजवण्याचा उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे.ही बंदी योग्य आहे कारण फटाके फोडण्याने फायदा होण्याऐवजी आपल्याला नुकसान च होणार आहे.फटाके फोडताना लहान मुलांचे अपघात होतात,शिवाय प्रदूषण, अंधत्व. दिवाळीचा आणि फटाक्यांचा तसे पाहिले तर काही संबंध नाही.फटाके फक्त दिवाळीच्या दिवसातच फोडले जात नाहीत तर ते आनंदाच्या प्रसंगी सुद्धा फोडले जातात,आनंद दर्शवण्यासाठी. पण असे ...

'कुतूहल' हिवाळ्यातील कोरड्या त्वचेचे.....

Image
         पाऊस थांबला की हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते.हिवाळ्याला सुरुवात झाली की त्वचेच्या अनेक समस्या डोके वर काढायला लागतात. हिवाळ्यात त्वचेची विशेषत्वाने काळजी घेणे आवश्यक आहे.हिवाळ्यात अनेक जणांना कोरडी रखरखीत त्वचा,त्वचेला खाज सुटणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते.त्वचा कोरडी पडण्यामागे वाढते वय, तीव्र रासायनिक साबण,क्रीम, खूप गरम पाण्याने आंघोळ करणे,स्टीम बाथ सतत घेणे,कपडे भांडी धुताना तीव्र पावडर, साबणाचा वापर,बदलते हवामान, थंड वातावरण ,जास्त पावर च्या औषधें ,अशी अनेक कारणे असू शकतात.यामुळे त्वचा फुटणे, कोरडी पडणे,खाज सुटणे असे त्रास होऊ शकतात.हिवल्यामुळे वातावरणातील कोरडेपणा त्वचेचे नुकसान करू शकतो. यासाठी काही उपाय वेळीच केले तर त्वचेची जास्त हानी, त्रास होणार नाही. या काळात काही त्वचारोग जास्त त्रासदायक ठरू शकतात. उदा. इसब,आटोपीक डरमाटायटीस ,सोरायसिस, ईचथिओसीस,रोझेशिया इ. या सगळ्या त्वचाविकारांसाठी ,थायरॉईड, मधुमेह,अशक्तपणा, पोषणमूल्याचा अभाव ,यकृताचे आजार,आणि स्त्रियांमध्ये मेनोपॉज या बाबीही कारणीभूत असू शकतात.त्वचा प्रमाणाबाह...