'कुतूहल'सुर्यसंक्रमणाचे,मकरसंक्रांतीचे...☀️🌞
एखादी वाईट घटना घडली, की 'संक्रांत आली' असे म्हटले जाते; ते योग्य नाही. दिनमान वाढत जाणे, सूर्य धनू राशीतून मकर राशीत जाणे,यात अशुभ असे काही नाही. संक्रांत सणाचा मूळ हेतू जर कायम ठेवायचा असेल तर मकर संक्रमणाचा आग्रह न धरता उत्तरायणाशी संक्रांतीची म्हणजे तिळगुळाची सांगड घातली पाहिजे.. सूर्याचा प्रवास मेष ते मीन या राशीतून होतो. प्रत्येक राशीत सूर्याचा प्रवेश झाला की त्या संक्रमणास संक्रांत म्हणतात. ज्या राशीत प्रवेश होईल त्या राशीच्या नावाने ती संक्रांत ओळखली जाते. उदा. सूर्याने मेष राशीत प्रवेश केला की त्या संक्रांतीला मेष संक्रांत म्हणतात. सर्व आबालवृद्धांना जी माहिती आहे ती मकरसंक्रांत तिळगूळ देण्याघेण्याशी या मकरसंक्रांतीचा संबंध आहे. त्यामुळेच ही संक्रांत सर्वपरिचित आहे. तिळगूळ हा स्निग्ध पदार्थ आहे आणि संक्रांतीच्या आगेमागे हिवाळा असतो, त्यामुळे ही तिळगूळ वाटपाची प्रथा पडली याबद्दल मतभिन्नता नसावी असे वाटते. उन्हाळा काय, हिवाळा काय हे ऋतू आहेत आणि ऋतूस कालावधी असतो. ऋ तू सहा धरले तर प्रत्येक ऋतूचा काळ दोन महिन्यांचा असतो. सूर्यस्थानाचा म्हणजे सूर...